बनावट नोटा अर्थव्यवस्थेला गंभीर धोका; दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण मत

बनावट नोटा अर्थव्यवस्थेला गंभीर धोका; दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण मत

बनावट नोटा चलनात आणणे हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांत बाधा येते, असे महत्वपूर्ण मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. बनावट नोटा आणि अमेरिकन डॉलर्स चलनात आणल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या व्यक्तीला जामीन नाकारताना न्यायालयाने हे निरिक्षण नोंदवले. न्यायमूर्ती शालिंदर कौर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

यापूर्वी दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने शोएब मलिक याला जामीन मंजूर करण्यास नकार दिला होता. त्या आदेशाविरोधात मलिकने उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती कौर यांनी सुनावणी घेतली. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मलिकला बनावट नोटा चलनात आणल्याच्या प्रकरणात सहआरोपी बनवून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मलिक हा बनावट नोटा चलनात आणण्यात तसेच छपाई करण्यात गुंतलेल्या मोठ्या टोळीचा सदस्य असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

मलिकने उच्च न्यायालयात दाद मागताना त्याच्याविरोधात पोलिसांकडे पुरावे नसल्याचे याचिकेत म्हटले होते. गुन्ह्यातील संबंध सिद्ध करणारे सबळ पुरावे नसतानाही पोलिसांनी आपल्याला दोन वर्षांहून अधिक काळ कोठडीत ठेवले आहे. मला तुरुंगात ठेवून कोणताही उद्देश साध्य होणार नाही, असे म्हणणे मलिकने मांडले होते. तथापि, त्याला जामीन मंजूर करण्यास दिल्ली पोलिसांनी तीव्र आक्षेप घेतला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती शालिंदर कौर यांच्या एकलपीठाने मलिकचे अपिल फेटाळून लावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू
आरेवारे समुद्रावर फिरायला गेलेले चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी रत्नागिरीत घडली. मयतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उज्मा...
मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत… सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा गंभीर आरोप
हैदराबादहून फुकेतला निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 16 मिनिटांतच परतले, कारण काय?
5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा मोदींना सवाल
Raigad News – पावसाळी पर्यटनासाठी आलेला मुंबईचा पर्यटक पाझर तलावात बुडाला
Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा मृत्यू
स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात