Sangli News – एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवले, मृतदेहाशेजारी कापलेले लिंबू

Sangli News – एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवले, मृतदेहाशेजारी कापलेले लिंबू

सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची घटना घडली. मृतदेहाशेजारी कापलेले लिंबू आणि सुरी आढळून आली आहे. यावरून जादूटोण्यातून ही घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात सासू आणि सुनेचा मृत्यू झाला असून पिता-पुत्राची प्रकृती गंभीर आहे.

रमेजा अल्लाउद्दीन पाटील, काजल समीर पाटील अशी मयत सासू-सुनेची नावं आहेत. तर अल्लाउद्दीन मकबूल पाटील आणि समीर अल्लाउद्दीन पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. पाटील कुटुंब गेल्या 15 दिवसांपासून दडपणाखाली होते, असे प्राथमिक तपासात कळते. घटनेची माहिती मिळताच जत आणि कवठेमहंकाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात पाटील कुटुंब राहते. कुटुंबातील एका वयोवृद्ध महिलेला शनिवारी सकाळी घरातील चौघेजण निपचिप पडलेले आढळून आले. महिलेने आरडाओरडा केला असता शेजारी धावून आले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहांशेजारी चार ग्लास, कापलेले लिंबू, सुरी आणि विषारी औषध आढळून आले. यावरून चौघांनी विषारी औषध प्राशन केले असावा असां अंदाज पोलिसांनी वर्तवला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू
आरेवारे समुद्रावर फिरायला गेलेले चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी रत्नागिरीत घडली. मयतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उज्मा...
मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत… सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा गंभीर आरोप
हैदराबादहून फुकेतला निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 16 मिनिटांतच परतले, कारण काय?
5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा मोदींना सवाल
Raigad News – पावसाळी पर्यटनासाठी आलेला मुंबईचा पर्यटक पाझर तलावात बुडाला
Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा मृत्यू
स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात