अतिशय लाजिरवाणे! भाजप दुटप्पी वागणुकीचा महागुरू; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

अतिशय लाजिरवाणे! भाजप दुटप्पी वागणुकीचा महागुरू; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधात नेहमीच कुरघोडी सुरू असतात. सतर्क सुरक्षा दलामुळे पाकड्यांचे सर्व कुटील डाव हाणून पाडण्यात येतात. कश्मीर खोऱ्यात घडणाऱ्या हिंसाचार आणि दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचा हात असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यातच आता केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट, हॉकी खेळण्याला परवानगी दिली आहे. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी भाजपला दुटप्पी वागणुकीचा महागुरू म्हटले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पायाभूत सुविधांच्या कामांना “सिंदूर” असे नाव दिले जात आहे… सध्या भाजपचे राजकारण “सिंदूर” भोवती फिरत आहे… पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कसे कुठून आले आणि कुठे गेले आहेत हे माहित नाही, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान सर्व दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत त्यावर बहिष्कार टाकण्याऐवजी, केंद्र सरकारने बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळ खेळण्यास परवानगी दिली आहे. तसेच आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत हॉकी आणि क्रिकेट खेळण्यासही सहमती दर्शवली आहे. खरोखरच भाजप दुटप्पी वागणुकीचे महागुरु आहेत. असे असून आता भाजप देशभक्तीचे प्रमाणपत्रे देते. हे खूप लाजिरवाणे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू Ratnagiri News – मुंबईच्या पाहुण्यांसह चौघांचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू
आरेवारे समुद्रावर फिरायला गेलेले चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी रत्नागिरीत घडली. मयतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उज्मा...
मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत… सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा गंभीर आरोप
हैदराबादहून फुकेतला निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 16 मिनिटांतच परतले, कारण काय?
5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा मोदींना सवाल
Raigad News – पावसाळी पर्यटनासाठी आलेला मुंबईचा पर्यटक पाझर तलावात बुडाला
Pandharpur News – विठुरायाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी! चंद्रभागा नदीत बुडून जालन्याच्या तीन महिलांचा मृत्यू
स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात