… तर राज्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल; उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपवर हल्लाबोल
लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. इंडिया आघाडीमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. याच मुद्द्यावरून उदयनिदी स्टॅलिन यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत पुन्हा हे सरकार सत्ते आले तर राज्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक देश आणि राज्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आला होता. आता उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. एका रॅलीला संबोधित करताना उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पुन्हा हे सरकार सत्तेत आले तर राज्यांना धोका आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार समान प्रमाणात निधीचे वाटप करत नाही. राज्यांकडून कराच्या रुपात एक रुपयाचा महसूल केंद्राला जात असेल तर त्यातील फक्त 28 पैसे राज्याला परत मिळतात. तसेच भाजप शासित राज्यांना केंद्राकडून जास्त महसूल मिळतो, असा आरोपही त्यांनी केला. केंद्राने तमिळनाडूचा निधी अडवला असून अनेक विकासाचे प्रकल्प रोखून धरले आहेत. निवडणुका जवळ येतात, तेव्हाच पंतप्रधान तमिळनाडूत येतात. इतरवेळी ते इकडे पाहतही नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List