विरोधकांना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र! केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 31 मार्चला ‘इंडिया’ची मेगा रॅली
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांना ईडीने अटक केली. त्याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली. ऐन निवडणुकीमध्ये हे अटकसत्र सुरू झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. या अटकेविरोधात ‘इंडिया’ आघाडीने 31 मार्च रोजी राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर मेगा रॅली आयोजित केली आहे. रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आप नेते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय म्हणाले की, “घटनेवर प्रेम करणाऱ्या आणि घटनेचा सन्मान करणाऱ्या देशभरातील लोकांमध्ये केजरीवाल यांच्या अटकेनंतर संतपाची लाट उसळली आहे. ही कारवाई फक्त केजरीवाल यांच्याविरोधातच नसून एक-एक करून विरोधी पक्ष संपवण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. आमदारांची खरेदी केली जात आहे. आमदारांना पैसे देऊन खरेदी जात असून दुसरीकडे तपास यंत्रणांचा धाक दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. जे लोक झुकले नाहीत, विकले नाहीत त्यांच्याविरोधात खोटे खटले दाखल करण्यात आले.”
#WATCH | Delhi: During the INDIA alliance press conference, AAP leader & Delhi minister Gopal Rai says, ” The way Delhi CM Arvind Kejriwal has been arrested, all those people across the nation who love and respect constitution, there is anger in their hearts. It is not just… pic.twitter.com/mfDyHuRy8Z
— ANI (@ANI) March 24, 2024
काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधकांना निवडणूक लढण्याची समान संधी मिळायला हवी. पण काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहे. ईडीच्या आडून मुख्यमंत्र्यांना अटक केली जात आहे. 31 मार्चला राजकीय नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी रॅली आयोजित करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List