‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमावर शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमावर शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे स्टारर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie ) नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी कोणती प्रतिक्रिया का दिली नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला. आता सिनेमावर अभिनेते शरद पोंक्षे यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सर्वत्र अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वीर सावरकर यांच्या भूमिकेतील रणदीप याचा फोटो पोस्ट करत अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ‘प्रत्येकाने पहायला हवा.मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही.पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

 

शरद पोंक्षे यांच्या पोस्टनंतर चाहते त्यांच्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत आहेत. शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहले लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आम्हाला खूप आवडला सिनेमा…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अतिशय सुंदर सिनेमा, वीर सावरकर’, शरद पोंक्षे यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाबद्दल काय म्हणाले वीर सावरकरांचे नातू?

वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी सिनेमावर प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘रणदीप हुड्डा याच्यासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. मी अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. पण मला माहिती आहे सिनेमासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने 30 किलो वजन कमी केलं आहे.’

‘सिनेमा एक असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून भारताचा इतिहास आपण नव्या पिढी पर्यंत पोहोचवू शकतो. मला आशा आहे की त्यांच्यावर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी सिनेमे बनतील.’ असं देखील वीर सावरकर यांचं नातू रणजीत सावरकर म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;