Ratnagiri News – शिक्षण वाचवा शाळा वाचवा! शाळा बंद ठेवत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Ratnagiri News – शिक्षण वाचवा शाळा वाचवा! शाळा बंद ठेवत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शिक्षण वाचवा शाळा वाचवा अशा घोषणा देत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने संचमान्यतेसंदर्भात प्रसिद्ध केलेला 15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर एक दिवस शाळाबंद आंदोलन छेडण्यात आले.

रत्नागिरी शहरातील माळनाका येथून शिक्षकांचा मोर्चा सुरू झाला. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. माळनाका येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. कार्यालयाबाहेर घोषणा दिल्यानंतर शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अय्युब मुल्ला, समन्वय समितीचे सचिव व अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर, रमेश तरवडेकर, मुख्याध्यापक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत, सचिव महेश पाटकर, मंगेश गोरिवले, नरेंद्र करमरकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते, सचिव रोहित जाधव, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संजय पाथरे, सचिव निलेश कुंभार, उर्दू संघटनेचे अध्यक्ष शौकत महाते, शिक्षक परिषदेचे सचिव पांडुरंग पाचकुडे, ग्रंथपाल संघटनेचे विवेक महाडिक , शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहूल सप्रे उपस्थित होते.

15 मार्च 2024 चा संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णय जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर येणारा आहे. यामुळे जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळा व अनुदानित माध्यमिक शाळा नामशेष होणार आहेत. जिल्ह्यातील इयत्ता नववी आणि दहावीचे 101 वर्ग शून्य शिक्षकी होत आहेत, तर जवळपास 76 शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत, अशी खंत व्यक्त करताना ग्रामीण भागातील शाळा बंद केल्या तर विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जावे लागेल. शिक्षण हे विद्यार्थ्यांना गावातच उपलब्ध करून दिले पाहिजे असे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;