महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मतांची चोरी
महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बिहारमध्येही मते चोरण्याचा निवडणूक आयोगाचा डाव आहे. हा गरीबांची मते हिसकावण्याचा प्रकार आहे. हे बिहार आहे आणि बिहारमधील जनता हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला इशारा दिला.
इंडिया आघाडीच्या वतीने मतदार याद्यांच्या फेरतपासणीविरोधात बिहार बंदची हाक दिली होती. त्यावेळी निघालेल्या मोर्चात राहुल गांधी बोलत होते. निवडणूक आयोगाला जे करायचे आहे ते त्यांनी करावे, परंतु, नंतर कायदा तुमच्यावर लागू होईल. कितीही मोठय़ा पदावर असाल, कायदा तुम्हाला सोडणार नाही असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List