Mohan Bhagwat – पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो; सरसंघचालकांचा रोख नेमका कोणाकडे?
“जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो”, असं वक्तव्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरमध्ये ‘मोरोपंत पिंगळे: द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जर’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. भागवत यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी मोरोपंत पिंगळे यांची एक आठवण सांगताना मोहन भागवत म्हणाले की, “पिंगळे म्हणाले होते की, जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे. आता जरा बाजूला सरा, आम्हाला ही करू द्या.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List