देशात गरिबांची संख्या वाढतेय, मोजक्या श्रीमंतांच्या हाती संपत्ती एकवटतेय- नितीन गडकरी

देशात गरिबांची संख्या वाढतेय, मोजक्या श्रीमंतांच्या हाती संपत्ती एकवटतेय- नितीन गडकरी

मोदी सरकारच्या काळात गरिबी घटल्याचा दावा जरी केला जात आहे. मात्र याच सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी देशातील गरिबीबात एक भाष्य करत स्वत:च्या सरकारला आरसा दाखवला आहे. ”देशात गरिबांच्या संख्येत वाढ होत आहे. तर संपत्ती ही काही मोजक्या श्रीमंत लोकांकडे एकवटली जात आहे’, असे नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, देशातील संपत्ती काही लोकांच्या हातात एकवटत आहे. तिचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. देशात हळू हळू गरिबांची संख्या वाढत आहे. व श्रीमंत लोकांची श्रीमंती वाढत आहे. असे होऊ नये म्हणून अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण भागाचा विकास होईल, असे गडकरी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;