देशात गरिबांची संख्या वाढतेय, मोजक्या श्रीमंतांच्या हाती संपत्ती एकवटतेय- नितीन गडकरी
मोदी सरकारच्या काळात गरिबी घटल्याचा दावा जरी केला जात आहे. मात्र याच सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी देशातील गरिबीबात एक भाष्य करत स्वत:च्या सरकारला आरसा दाखवला आहे. ”देशात गरिबांच्या संख्येत वाढ होत आहे. तर संपत्ती ही काही मोजक्या श्रीमंत लोकांकडे एकवटली जात आहे’, असे नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, देशातील संपत्ती काही लोकांच्या हातात एकवटत आहे. तिचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. देशात हळू हळू गरिबांची संख्या वाढत आहे. व श्रीमंत लोकांची श्रीमंती वाढत आहे. असे होऊ नये म्हणून अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण भागाचा विकास होईल, असे गडकरी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List