अशा लोकांसाठी जागा नाही..; ‘ये रिश्ता..’चा वाद टोकाला, मुख्य कलाकारांना काढून टाकल्यानंतर निर्मात्यांची प्रतिक्रिया

अशा लोकांसाठी जागा नाही..; ‘ये रिश्ता..’चा वाद टोकाला, मुख्य कलाकारांना काढून टाकल्यानंतर निर्मात्यांची प्रतिक्रिया

मुंबई : 20 मार्च 2024 | स्टार प्लस वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या दोन कलाकारांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत नवीन कलाकार दिसणार आहेत. ‘ये रिश्ता..’मध्ये अरमान आणि रुहीची भूमिका साकारणाऱ्या शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांना अचानक मालिकेतून काढून टाकल्याने चाहतेसुद्धा चकीत झाले आहेत. यावर आता निर्माते राजन शाही यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “कलाकारांसोबत माझे अनेकदा वाद होतात. मात्र शोपेक्षा अधिक महत्त्वाचं कोणीच नाही, निर्माताही नाही. मी माझ्या मालिकेतील कलाकारांच्या कामाचं नेहमीच कौतुक करतो. मात्र अनेकजण असा चुकीचा दावा करतात की त्यांना 18 तास शूटिंग करावी लागते. असं दररोज घडत नाही, कधीतरी त्यांना अधिक तास थांबून काम करावं लागतं. प्रेक्षक त्यांच्या लाडक्या कलाकारांबद्दल असा विचार करतात की ते सतत कामच करत असतात. मात्र याबाबतीत मी नेहमीच स्पष्ट केलंय. मी असा एकमेव निर्माता असेन जो त्याच्या कलाकारांच्या मेहनतीचं कौतुक करायला सर्वांत आघाडीवर असेल. पण माझ्यासोबत जर कोणी वाईट वागत असेल किंवा मला त्रास दिला जात असेल तर मी ते सहन करणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by SHEHZADA DHAMI (@the__shehzadaaa)

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नुकतीच जनरेशन लीप दाखवण्यात आली होती. त्यानंतर मुख्य भूमिकांसाठी शहजादा आणि प्रतीक्षा यांची निवड करण्यात आली होती. मात्र शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे हे दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. या दोघांमधील जवळीक वाढली होती आणि त्याचा परिणाम मालिकेच्या कामावर होऊ लागला होता. सेटवरील त्यांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे आधी क्रिएटीव्ह टीमशी वाद झाला. नंतर हा मुद्दा थेट प्रॉडक्शन हाऊसपर्यंत पोहोचला. दोघांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

या मालिकेत आता गर्विता सधवानी रुहीची भूमिका साकारणार आहे. तर रोहित पुरोहितने शहजादाची जागा घेतली आहे. गर्विताने याआधी ‘बातें कुछ अनकहीं सी’ या मालिकेत मृणालची भूमिका साकारली होती. तर श्वेता तिवारीच्या ‘मैं हूँ अपराजिता’मध्ये ती नियाच्या भूमिकेत होती. आता अरमान आणि रुहीच्या भूमिकेत हे नवीन कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;