पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवानाला NIA कडून अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवानाला NIA कडून अटक

पाकिस्तानसठी हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला अटक केली आहे. मोती राम जाट असे अटक केलेल्या जवानाचे नाव असून तो 2023 पासून पाकिस्तानला गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

अटकेनंतर मोती राम जाटला दिल्लीतील पटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएने पुढील चौकशीसाठी त्याच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत त्याला 6 जूनपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोती राम जाटला दिल्लीतून अटक करण्यात आली असून एनआयए त्याची सखोल चौकशी करत आहे. तपासकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, मोती राम जाटला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित गोपनीय माहिती देण्यासाठी विविध मध्यस्थांमार्फत पैसे मिळत होते. एजन्सीला असा संशय आहे की, जाट 2023 पासून गोपनीय माहिती शेअर करत होता. तपास यंत्रणांशी समन्वय साधून जाट्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. यानंतर अटक करण्यात आली. या काळात कोणत्या प्रकारची माहिती चोरीला गेली याचा तपास अधिकारी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू! तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू!
गेल्या 15 वर्षांपासून अडथळय़ांच्या चक्रव्यूहात अडकलेली सोलापूरची विमान सेवा आजपासून सुरू झाली. पेंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या...
दोन वर्षांत हिंदुस्थानातील रस्ते अमेरिकेसारखे होतील
सोनमनेच केली पतीची हत्या, शिलाँग पोलिसांनी घेतले ताब्यात
सांगली पालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक, लाच मागितल्याने कारवाई
ग्रेटा थनबर्ग यांच्यासह त्यांचे जहाज इस्रायलच्या ताब्यात, पॅलेस्टिनींसाठी मदत साहित्य घेऊन जात होते
बिहारचे डबल इंजिन सरकार महिलांसाठी धोकादायक, प्रियांका गांधी यांचा नितीश कुमार सरकारवर हल्ला
मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर महागाई वाढली, महामार्ग बंद केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा