शिवसैनिकांनो मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा, उद्धव ठाकरे यांचे आदेश

शिवसैनिकांनो मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा, उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबईत मान्सून दाखल झाला आहे आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सोमवारी कामासाठी निघालेला चाकरमानी अनेक ठिकाणी अडकला आहे. त्यामुळे शैवसैनिकांनी मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच मुंबईकरांची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या अधिकृत एक्स अकांऊटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की,
पहिल्या पावसामुळे मुंबईत नागरिकांची मोठी गैरसोय होतेय. अशा वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या मुंबईकरांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे हिंदमाता परिसरात
दुसरीकडे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे हिंदमातामध्ये पोहोचले आहेत तसेच तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू! तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू!
गेल्या 15 वर्षांपासून अडथळय़ांच्या चक्रव्यूहात अडकलेली सोलापूरची विमान सेवा आजपासून सुरू झाली. पेंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या...
दोन वर्षांत हिंदुस्थानातील रस्ते अमेरिकेसारखे होतील
सोनमनेच केली पतीची हत्या, शिलाँग पोलिसांनी घेतले ताब्यात
सांगली पालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक, लाच मागितल्याने कारवाई
ग्रेटा थनबर्ग यांच्यासह त्यांचे जहाज इस्रायलच्या ताब्यात, पॅलेस्टिनींसाठी मदत साहित्य घेऊन जात होते
बिहारचे डबल इंजिन सरकार महिलांसाठी धोकादायक, प्रियांका गांधी यांचा नितीश कुमार सरकारवर हल्ला
मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर महागाई वाढली, महामार्ग बंद केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा