सिंधू कराराबाबत पुर्नविचार करावा, पाकिस्तानची हिंदुस्थानकडे याचना

सिंधू कराराबाबत पुर्नविचार करावा, पाकिस्तानची हिंदुस्थानकडे याचना

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलली. सर्वात आधी हिंदुस्थानने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला. पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही, असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. हिंदुस्थानकडून पाणी कोंडी झाल्यामुळे पाकिस्तानची सध्या तडफड सुरू आहे. त्यामुळे अखेर बुधवारी पाकिस्तानने हिंदुस्थानकडे सिंधू जल करार स्थगितीवर पुर्नविचार करावा अशी याचिकाच केली असल्याचे सूत्रांकडून समजते. पाकिस्तानच्या मंत्रालयाने हिंदुस्थान सरकारला तशी याचना करणारे पत्र पाठवले आहे.

सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती अडचणीत सापडली आहे. तसेच पाकिस्तानात पाणी संकट निर्माण झाले आहे. सिंधू नदीमुळे पाकिस्तानातील 17 कोटी लोकसंख्येला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हिंदुस्थानने चिनाब नदीचे पाणी देखील थांबवले आहे. आधी सिंधू करार रद्द मग चिनाब नदीचे पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानची अजूनच कोंडी झाली आहे.

तसेच हिंदुस्थानने पाकिस्तान सीमेवर असलेली सलाल आणि बाघलियार धरणे बंद केली. पाकिस्तानला या धरणातून पाणी मिळत होते. याचा वापर पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जात होता.

जागतिक बँकेचा हस्तक्षेपास नकार

सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती पाकिस्तानने केली होती. पाकिस्तानच्या या मागणीला जागतिक बँकेने केराची टोपली दाखवली होती. जागतिक बँकेला या कराराशी काहीही देणेघेणे नसून यात बँकेची मध्यस्थाची भूमिकाही नाही, अशा स्पष्ट शब्दांत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी सिंधू जल करारात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;