पाकने केलेल्या गोळीबारात कश्मिरी नागरीक मारले गेलेत, त्यांच्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही! ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली खंत

पाकने केलेल्या गोळीबारात कश्मिरी नागरीक मारले गेलेत, त्यांच्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही! ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली खंत

पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी कश्मिरमधील नागरिकांवर झालेल्या दुर्लक्षाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. पहलगाम नंतर आॅपरेशन सिंदुर अंतर्गत हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. परंतु याच घडामोडीत पाकिस्तानच्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात अनेक कश्मिरी नागरीक मरण पावले. या नागरिकांकडे सरकार लक्ष देत नसल्याचं ओमर अब्दुल्ला यांना इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं आहे.

 

ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानने असा घेतला फायदा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नाण्याची दुसरी बाजू मांडली

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर “संताप” असे म्हणत टीका केली. पाकिस्तानच्या सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूंकडे देशाने लक्ष न दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अब्दुल्ला म्हणाले की, पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांच्या मृत्युवर देशाने योग्यरित्या शोक व्यक्त केला आहे. असे असले तरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात झालेल्या जीवितहानीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे.

पहलगाममध्ये घडलेल्या 26 निष्पाप पर्यटकांबद्दल देशात उत्स्फूर्तपणे संताप व्यक्त होताना दिसला. परंतु पाकिस्तानच्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या काश्मिरींबद्दल पुरेसे बोलले जात नाही याबद्दलही निराशा व्यक्त केली जातेय. अब्दुल्ला म्हणाले, ”धार्मिक सीमा ओलांडून विविध जिल्ह्यांमध्ये नागरिक आणि लष्करी जीवितहानी झाली आहे. आम्ही राजौरी, पूंछ, उरी, बारामुल्ला येथे लोक गमावले आहेत. आम्ही मुस्लिम, हिंदू, शीख गमावले आहेत. आम्ही नागरिक आणि लष्करी कर्मचारी गमावले आहेत. गुरुद्वारा आणि मंदिरे उद्धवस्त झाली आहेत तर, आम्ही पुंछमधील मदरसे सुद्धा गमावले आहे.”

22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मिर अक्षरशः कोलमडले. पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे, बहुतांशी पर्यटकांनी कश्मिरकडे पाठ वळवली. त्यामुळे कश्मिरच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. त्यात आॅपरेशन सिंदूरनंतर तर कश्मिर जगाच्या पटलावर अधिक ठळकपणे मलिन झालेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोरासोबत पाकिस्तानी गाण्यावर थिरकली कंगना राणौत; युजर्सने ट्रोल करत म्हटलं ‘देशद्रोही’ मोरासोबत पाकिस्तानी गाण्यावर थिरकली कंगना राणौत; युजर्सने ट्रोल करत म्हटलं ‘देशद्रोही’
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते किंवा वादात असते. आताही एका व्हिडीओमुळे कंगना पुन्हा एकदा वादात...
अक्षय कुमारचे 80 कोटींचे आलिशान घर एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही; लिव्हिंग रूम ते होम ऑफिसपर्यंत सगळंच खास, फोटो पाहाच
Hot Air Baloon Incident – महोत्सवादरम्यान हॉट एअर बलूनला आग, एकाचा दुर्दैवी मृत्यू
Cyclone Shakti Alert: मान्सूनपूर्वी ‘शक्ती चक्रीवादळ’चा धोका, हवामान विभागाने जारी केला अलर्ट
जायकवाडी धरणावरील चारीचे पाणी फळबाग-पिकांत घुसल्याने शेतात पाणीच पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
महाराष्ट्राला मोठा धक्का! फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प यूपीत उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; फडणवीसांचा दावा ठरला पोकळ
सत्य का काम है चुभना, पोस्ट शेअर करत कुणाल कामराने सत्ताधाऱ्यांना डिवचले