जायकवाडी धरणावरील चारीचे पाणी फळबाग-पिकांत घुसल्याने शेतात पाणीच पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जायकवाडी धरणावरील चारीचे पाणी फळबाग-पिकांत घुसल्याने शेतात पाणीच पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पैठणमधील मुख्य डाव्या कालव्यावरील चारीचे पाणी फळबागात, पिकांत घुसले. यामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वडीगोद्री उप विभागांतर्गत डाव्या कालव्यावरील चाऱ्या ( वितरीका ) क्रमांक 14 ते 22 अशा कालव्याच्या 9 वितरिका आहेत. या 9 वितरिकांच्या प्रत्येकी 3 ते 4 उप वितरिका आहेत. या सर्व वितरिका व उप वितरिकाद्वारे सुमारे 8 हजार हेक्टर पिकांना पाणी मिळते. सध्या डाव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनसाठी पाणी दिले जात आहे. यासाठी चाऱ्यांची उपचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य चाऱ्यांची दुरुस्ती कधी-कधी होते. मात्र ती थातुरमातुर बिले काढण्यासाठी होऊन दोन ते तीन महिन्यांत चाऱ्यांची अवस्था जशासतशी होऊन जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना श्रमदानातून दुरुस्ती करावी लागते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपचाऱ्यांकडे लक्षही देत नाहीत. शेतकरीच पिकांना पाणी देण्यासाठी स्वतः खर्च करून पाणी देतात.

चारी क्रमांक 18-वर संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत पाणी सोडताना शेतकऱ्यांचे नुकसान कोणी पाहत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकात पाणी साचते. या चारीला कालव्यातून पाणी सोडताना चारीची क्षमता किंवा चारीत पाण्याची क्षमता किती आहे. याचा कुठल्याही अंदाज न घेता पाणी सोडून चारी ओव्हर फ्लो होते. वडीगोद्री येथील शेतकरी ज्ञानेश्वर भीमराव आटोळे मोसंबीच्या बागामध्ये चारीचे पाणी पाणीच साचून तळ्याचे स्वरुप आल्याने मोसंबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेहमीप्रमाणे मोसंबीचे आणि फळबागांचे नुकसान होत असल्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असता त्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. अधिकारी दखल घेत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी स्वतः जाऊन चारीचे पाणी बंद केले. अधिकाऱ्यांच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी ज्ञानेश्वर आटोळे व या चारीखालील शेतकऱ्यांचे चारीच्या पाण्याने जे नुकसान झाले त्याच्या पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;