भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली. आता या पार्श्वभूमीवर भारतात सतर्कता बाळगली जात आहे. त्यातच आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना रविवारपासून हार आणि नारळ अर्पण करता येणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना
देशातील विविध महानगरांमध्ये वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केली आहे. देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक...
बांगलादेशात सत्तापालटानंतर दीड वर्षांनी होणार निवडणुका, मोहम्मद युनूस यांची घोषणा
आईला मुलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
Bihar Election 2025 – आम्ही स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करत आहोत, मतमोजणी आधी तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास
लग्नाआधी जोडीदाराला या तीन चाचण्या करायला लावाच, तिसरी चाचणी फारच महत्त्वाची, नाहीतर आयुष्यभर रडत बसण्याची येईल वेळ
माहेरून परतत असताना काळाचा घाला, दुभाजकावर धडकून कार पेटली; सहा महिन्यांच्या गर्भवतीचा होरपळून मृत्यू
Ratnagiri News – सहा प्रभागात भाजपकडून बंडखोरीची शक्यता, शिंदे गटाला अधिक जागा सोडल्याने अनेकांचे पत्ते कट