भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली. आता या पार्श्वभूमीवर भारतात सतर्कता बाळगली जात आहे. त्यातच आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना रविवारपासून हार आणि नारळ अर्पण करता येणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
हिंदुस्थानच्या लेकींनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. सोमवारी...
PHOTO – मतदार यादीतील गोंधळ तातडीने दूर करा, आदित्य ठाकरे यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद, आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
IND Vs SA 2nd Test – मार्को यान्सनचा भेदक मारा अन् 15 वर्षांनी घडला नवा विक्रम; टीम इंडिया बॅकफुटवर
उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यायला हवे, वाचा
प्रारूप मतदार यादीतील गोंधळ हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा, याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार; आदित्य ठाकरेंचा इशारा
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, चाहते भावूक