मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले?

मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले?

मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी ८ मे रोजी जाहीर होणार होता. यापूर्वी, १९ एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. परंतु आजही निकाल देण्यात आला नाही. निकालासाठी पुढील तारीख दिली गेली आहे. या निकालाबाबत बॉम्बस्फोट खटाल्यातील आरोपी स्वाध्वी प्रज्ञा यांनी एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपला ‘सत्यमेव जयते’वर पूर्ण विश्वास आहे, असे म्हटले आहे.

मालेगावातील एका धार्मिक स्थळाबाहेर २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच १०१ जण जखमी झाले होते. या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी येणार होता. १ लाखापेक्षा जास्त पाने असल्याने अभ्यास करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे या खटल्याचा निकालासाठी आता ३१ जुलैची पुढील तारीख देण्यात आली आहे. आतापर्यंत कोर्टात या प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिव्वेदी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.

निकालाच्या पूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले की, कोणावर अन्याय होणार नाही, अशी मला अशा आहे. माझा सत्यमेव जयतेवर पूर्ण विश्वास आहे. देशात देशभक्त राहिला पाहिजे, गद्दार नाही. पूजा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, त्यात अडथळा आणणे हक्क नाही. काँग्रेसने शहीद जवानांचा नेहमी अपमान केला. मात्र, भाजपने शहीद जवानांना सन्मान दिला आहे. नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांचा आहे. या भारतामध्ये आम्ही कोणाला छेडत नाही आणि आम्हाला छेडल तर त्याला सोडत नाही.

मालेगाव खटल्याची पार्श्वभूमी अशी

मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटला एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांच्यासमोर सुरु आहे. या खटल्यात सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले आहे. त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत. या खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित दहशतवाद विरोधी कायदा आणि युएपीए अंतर्गत खटला चालला. या खटल्यात श्याम साहु, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे हे आरोपी फरार घोषित करण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Heart Attack: हार्ट अटॅक टाळण्यासाठी दररोज किती वेळ चालायला हवं? Heart Attack: हार्ट अटॅक टाळण्यासाठी दररोज किती वेळ चालायला हवं?
दररोज व्यायाम करणे हे हृदयाच्या आरोद्यासाठी खूप फायदेशीर आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी दररोज किती वेळ...
रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर, लोकलच्या धडकेत चौघांचा मृत्यू
Pune News – पुण्यातील माजी नगरसेविका प्राची आल्हाट यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल; डॉक्टरांची २४ लाखांची फसवणूक
Photo – मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Ratnagiri News – रत्नागिरी शहरात ६४ हजार ७४६ मतदार आपला हक्क बजावणार, ६९ मतदान केंद्रांवर होणार मतदान
माझा दुरान्वयेही संबंध नाही, मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी; पार्थ पवारांवरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, सीएसएमटी स्थानकावर सर्व लोकल ट्रेन उभ्या; कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली