मिठागरांच्या जमिनी खासगी बिल्डरांना आंदण, कोर्टाने मागितले याचिकेवर स्पष्टीकरण
धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानी पंपनीला मिठागरांच्या जमिनी आंदण दिल्या जात आहेत. याप्रकरणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर स्पष्टीकरण द्या असे न्यायालयाने आज याचिकाकर्त्याला सांगितले.
पेंद्र सरकारने मिठागरांच्या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आणि या जमिनींवर अदानीच्या पंपनीला अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन करण्यास मुभा दिली. मात्र, निव्वळ खासगी विकासकांच्या फायद्यासाठी सरकार मिठागरांच्या जमिनीवर अतिक्रमण करून पर्यावरणाचे नुकसान करत आहेत, अशी जनहित याचिका मुलुंड येथील अॅड. सागर देवरे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List