Mumbai Accident News – अपघातात तिघांचा मृत्यू

Mumbai Accident News – अपघातात तिघांचा मृत्यू

बोरिवली आणि विक्रोळी येथे झालेल्या वाहन अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग आणि विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. पहिला अपघात बोरिवलीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडला. राहुल तोडणकर हा मंगळवारी दुपारी मोटरसायकलने बोरिवली येथे गेला होता. तेव्हा भरधाव वेगातील टँकरने त्याला धडक दिली. त्यात राहुलचा मृत्यू झाला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी टँकरचालक प्रवीण भाई पागीला अटक केली, तर दुसऱ्या अपघातात अक्षतसिंग हा तरुण बोरिवलीहून घराच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला वाहनाने धडक दिली. त्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला असून कस्तुरबा मार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तर तिसरी अपघाताची घटना विक्रोळी येथे घडली. एका अनोळखी व्यक्तीला वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख पटलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;