Mumbai Accident News – अपघातात तिघांचा मृत्यू

Mumbai Accident News – अपघातात तिघांचा मृत्यू

बोरिवली आणि विक्रोळी येथे झालेल्या वाहन अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग आणि विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. पहिला अपघात बोरिवलीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडला. राहुल तोडणकर हा मंगळवारी दुपारी मोटरसायकलने बोरिवली येथे गेला होता. तेव्हा भरधाव वेगातील टँकरने त्याला धडक दिली. त्यात राहुलचा मृत्यू झाला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी टँकरचालक प्रवीण भाई पागीला अटक केली, तर दुसऱ्या अपघातात अक्षतसिंग हा तरुण बोरिवलीहून घराच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला वाहनाने धडक दिली. त्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला असून कस्तुरबा मार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तर तिसरी अपघाताची घटना विक्रोळी येथे घडली. एका अनोळखी व्यक्तीला वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख पटलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल