Operation Sindoor जय हिंद! दहशतवादाला असे ठेचा की ते पुन्हा डोके वर काढू शकणार नाहीत – आदित्य ठाकरे
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”दहशतवाद तो कोणत्याही प्रकारचा असला तरी तो संपवलाच पाहिजे. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदुस्थानी संरक्षण दलाने केलेल्या एअर स्ट्राईक केला. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या ठिकाणांवर अचूक हल्ले केल्याबद्दल मी हिंदुस्थानी संरक्षण दलाचे अभिनंदन करतो. दहशतवाद्यांना असे मारा की पुन्हा ते उभे राहू शकणार नाहीत, जय हिंद!, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List