सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षांशी होणार चर्चा

सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षांशी होणार चर्चा

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 पर्यटकांना मारलं होतं. आता हिंदुस्थानी सैन्याने याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता यावरच चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 8 मे रोजी सकाळी 11 वाजता संसदेत ही बैठक होणार आहे. या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबद्दल विरोधी पक्षांना माहिती दिली जाईल आणि पुढची रणनीती काय असेल याबाबत सांगितले जाईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. सर्वपक्षीय बैठक संसदेच्या पुस्तकालय भवनातील समिती कक्षा जी074 मध्ये होईल असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानी सैन्याने रात्री 1.44 वाजता पाकिस्तानच्या 9 ठिकाणी क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात दहशतवाद्यांची अनेक तळ उद्ध्वस करण्यात आली आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला म्हणून हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल