पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारकडे मागणी

पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारकडे मागणी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आता या हल्ल्यातील नवनवीन अपडेट सातत्याने समोर येत असून हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वत्र संतापाचा लाट उसळली आहे. यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करत सरकावर टीका केली आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पाकिस्तानबाबत मोठे विधान केले आहे. पहलगाम हल्ला हा निव्वळ वेडेपणा आहे, असे ते म्हणाले.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हा हल्ला एक सुनियोजित कट होता. बैसरन व्हॅली पहलगामपासून थोडे वरच्या दिशेला आहे. त्यामुळे तिथे कार आणि इतर वाहतुकीची साधने पोहोचू शकत नाहीत. तिथे फक्त घोडे आणि खेचरच पोहोचतात. त्यामुळे हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना तिथे पोहोचण्यासाठी बराच वेळ लागेल हे माहित असल्याने दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी बैसारण खोऱ्याची निवड केली. कारण सुरक्षा दलांचे अधिकारी पोहोचेपर्यंत दहशतवादी सहज पळ काढू शकतात, असे ते यावेळी म्हणाले.

दहशतवाद्यांनी पुरुष आणि महिलांना वेगळे केले, हे देखील काळजीपूर्वक विचार करून केले. हल्ल्याच्या एक आठवडा आधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी केलेल्या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही आमच्या कश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षात सोडणार नाही… अशी विधाने त्यांनी केली होती. मी गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करू इच्छितो की या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवावा. पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे. मला खात्री आहे की, विरोधी पक्ष याला पाठिंबा देईल, असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले असीम मुनीर?

आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, ही आमची मानेची नस होती, आमच्या मानेचीच नस राहील. आपण हे विसरणार नाही. आम्ही आमच्या कश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षात सोडणार नाही. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बरेच फरक आहेत. आणि पाकिस्तानी मुस्लिम प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. ‘आपल्या पूर्वजांना वाटायचे की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत; आपला धर्म वेगळा आहे, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांनी पाकिस्तानची कहाणी विसरू देऊ नये, असे विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update: महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचं संकट; 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट, आयएमडीचा झोप उडवणारा इशारा IMD Weather Update: महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचं संकट; 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट, आयएमडीचा झोप उडवणारा इशारा
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांसह मुंबईतील चाकरमान्यांना बसला आहे....
839 कोटींचा नेकलेस, डोक्यापासून पायापर्यंत मोती, पाचू,हिरे; मेट गालामध्ये आईच्या दागिन्यांमध्य ईशा अंबानीची रॉयल झलक
‘औकात नहीं है…’, या पाकिस्तानी स्टार्संना विदेशातून सोशल मीडियावर ट्रोल; हानिया ते माहिरा सर्वच रडारवर
Operation Sindoor नंतरची ही आहे बुलेटप्रुफ तयारी, पाकिस्तानची आता होणार ऐशी की तैशी..
IPL 2025 – हिंदुस्थान अलर्ट! आयपीएल मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना धर्मशाळावरून अहमदाबादला शिफ्ट केला
Operation Sindoor- पाकिस्तानला ‘चायना माल’ पडला महागात, हिंदुस्थानच्या ‘ड्रोन स्ट्राइक’ने लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त
Operation Sindoor – कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाईंड अब्दुल अझर हिंदुस्थानच्या हल्ल्यात ठार