पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही; केसी वेणुगोपाल यांचे मोदींना प्रत्युत्तर

पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही; केसी वेणुगोपाल यांचे मोदींना प्रत्युत्तर

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळ येथील तिरुअनंतपुरममध्ये सागरी बंदरचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं होतं की, “आजचा कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल.” यालाच आता प्रत्युत्तर देत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी हल्लाबोल केला आणि म्हटले की, “पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही.”

केसी वेणुगोपाल म्हणाले, “पंतप्रधान असे का बोलत आहेत, हे मला माहित नाही. मात्र ज्यांची रात्री झोप उडेल ते पंतप्रधान असतील, इंडिया आघाडी, राहुल गांधी किंवा काँग्रेसची नाही. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्यावर जास्तीत जास्त दबाव आणणार आहोत. त्यांनी महिला आरक्षण विधेयकाप्रमाणे ही घोषणा केली. आम्ही शांतपणे झोपू शकू, पण पंतप्रधानांना झोप येणं कठीण होणार आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;