पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही; केसी वेणुगोपाल यांचे मोदींना प्रत्युत्तर
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळ येथील तिरुअनंतपुरममध्ये सागरी बंदरचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं होतं की, “आजचा कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल.” यालाच आता प्रत्युत्तर देत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी हल्लाबोल केला आणि म्हटले की, “पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही.”
केसी वेणुगोपाल म्हणाले, “पंतप्रधान असे का बोलत आहेत, हे मला माहित नाही. मात्र ज्यांची रात्री झोप उडेल ते पंतप्रधान असतील, इंडिया आघाडी, राहुल गांधी किंवा काँग्रेसची नाही. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्यावर जास्तीत जास्त दबाव आणणार आहोत. त्यांनी महिला आरक्षण विधेयकाप्रमाणे ही घोषणा केली. आम्ही शांतपणे झोपू शकू, पण पंतप्रधानांना झोप येणं कठीण होणार आहे.”
#WATCH | Delhi: Congress General Secretary KC Venugopal says, ” I don’t know on what ground PM is saying like this…the PM will be the one who will be having sleepless nights, not INDIA alliance, Rahul Gandhi or Congress. We are going to put maximum pressure on him on the issue… https://t.co/2rs4ju7sLu pic.twitter.com/tGaOnBeyyd
— ANI (@ANI) May 2, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List