“जितकं मी इस्लामला समजू शकले..”; मुस्लीम अभिनेत्याशी लग्न केलेल्या दीपिकाचं पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य

“जितकं मी इस्लामला समजू शकले..”; मुस्लीम अभिनेत्याशी लग्न केलेल्या दीपिकाचं पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम नुकतेच काश्मीरला फिरायला गेले होते. ज्यादिवशी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्याचदिवशी ते श्रीनगरहून दिल्लीला परतले होते. आता एका व्लॉगद्वारे दीपिकाने पहलगाम हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलंय. दीपिकाने शोएबशी आंतरधर्मीय लग्न केलंय. लग्नांतर इस्लाम धर्माविषयी जे शिकायला किंवा समजायला मिळालं, त्यावरून असा हल्ला प्रामाणिक मुस्लीम करूच शकत नाही, असं तिने म्हटलंय. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक वेगळ्याच प्रकारची निराशा जाणवतेय. विचार करण्याची किंवा समजण्याची क्षमता संपलेली असते, तसं वाटू लागलंय”, असं दीपिका म्हणाली.

पहलगाम हल्ल्याविषयी भावना व्यक्त करत ती पुढे म्हणाली, “या घटनेनं सर्वांनाच पूर्णपणे हादरवून टाकलं आहे. या हल्ल्याविषयीचे जे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतायत, ते पाहून माझं मन खूप दुखावतंय. घटनेच्या काही तासापूर्वी आम्ही काश्मीरमध्येच होतो. परंतु आम्ही बैसरन व्हॅलीला भेट दिली नव्हती. आपल्या कुटुंबीयांसोबत, प्रिय व्यक्तीसोबत फिरायला आलेल्यांना अशा धक्कादायक घटनेचा सामना करावं लागणं हे प्रचंड वेदनादायी आहे. या घटनेनं माझं हृदय पिळवटून निघालं आहे.”

“त्या पर्यटकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. काश्मीर ही खूप सुंदर जागा आहे, तिथले लोक खूप प्रेमळ आहेत. तिथल्या वातावरणात इतकी शांती जाणवते, जे मी शब्दांत सांगू शकत नाही. अशा ठिकाणी निरपराध लोकांवर असा हल्ला होणं खरंच दुर्दैवी आहे. त्या पर्यटकांचा काहीच दोष नव्हता. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला, त्यांना सर्वांसमोर शिक्षा मिळाली पाहिजे. प्रत्येकाचं दु:ख त्यांना जाणवलं पाहिजे”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

दीपिकाने मुस्लीम अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केलंय. इस्लाम धर्माविषयी तिने सांगितलं, “जितकं मी इस्लामला समजू शकले, त्यावरून मी हे खात्रीनं म्हणू शकते की कोणी प्रामाणिक मुस्लीम असं काम करू शकणार नाही. एखाद्या निर्दोष व्यक्तीला अशा पद्धतीने धर्माच्या नावाखाली किंवा इतर कसल्याही नावाखाली मारणं हे इस्लाम शिकवत नाही. हे इस्लामच काय, तुम्हाला कोणताच धर्म अशी शिकवण देत नाही. बायबल असो, कुराण असो, गीता असो, गुरूग्रंथसाहिब असो.. कोणत्याच धर्मग्रंथात असं लिहिलेलं नाही. एकमेकांसोबत प्रेमाने रहा, हेच प्रत्येक धर्म सांगतो. जे लोक अशा पद्धतीचे हल्ले करतात ते कोणत्याच धर्माचे नसतात. ते दहशतवादी आहेत आणि दहशतवाद्यांचा कोणताच धर्म नसतो. माणूस म्हणून ते चुकीचेच आहेत.”

दीपिका आणि शोएब हे त्यांच्या मुलासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा ते श्रीनगरहून दिल्ली परत येत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जयशंकर यांच्या...
Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
अंबाबाई, जोतिबा मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई
कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला
पाकिस्तानात घुसून मोदींनी नक्षलवाद्यांना खतम केले! बावनकुळेंचे अगाध ज्ञान
जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा