पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल

पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल

पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्यासाठी शुक्रवारी जलशक्ती मंत्रालयाची बैठक झाली. याबाबत 3 टप्प्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली. सी.आर. पाटील म्हणाले की, “याबाबत तीन प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जलशक्ती मंत्री सीआर पाटील सहभागी झाले होते. 3 टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या रणनीतींबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 23 एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानला पत्र पाठवून हिंदुस्थानने याबाबत अधिकृत माहिती दिली. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;