2014च्या खऱ्या स्वातंत्र्यानंतर काय अवस्था…; कलमा शिकणाऱ्या भाजप नेत्यावर स्वराचा निशाणा

2014च्या खऱ्या स्वातंत्र्यानंतर काय अवस्था…; कलमा शिकणाऱ्या भाजप नेत्यावर स्वराचा निशाणा

Swara Bhasker On Nishikant Dubey: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जातात. ती अनेकदा देशातील समाजिक मुद्द्यांवर बोलताना दिसते. अभिनेत्रीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर भाजप नेते निशिकांत दुबे यांनी कलमा शिकण्याबाबत केलेल्या पोस्टवर निशाणा साधला. अभिनेत्रीने म्हटले की, ‘2014 च्या खऱ्या स्वातंत्र्यानंतर काय अवस्था झाली आहे.’

भाजप नेते निशिकांत दुबे यांनी काय केली पोस्ट?

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दुर्दैवी घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी गोळी चालवण्याआधी पुरुषांना त्यांचा धर्म विचारला आणि कलमा बोलण्यास सांगितले होते. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी पहलगाम हल्ल्यात कलमा न वाचण्याबाबत आणि निरपराध लोकांच्या मृत्यूबाबत सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले होते, “अशहदु अल्लाह इल्लाह इल्लल्लाहु वह दहु ला शरी-क लहू व अशदुहु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु… सध्या मी कलमा शिकत आहे, कधी गरज पडेल कोण जाणे.”
वाचा: शिमला करार नेमका काय आहे? जो रद्द करण्याची धमकी पाकिस्तान देत आहे

भाजप नेत्याच्या पोस्टवर स्वराने साधला निशाणा

भाजप नेत्याच्या पोस्टला री-पोस्ट करत स्वरा भास्करने टोला लगावला आहे. “बघा… 67 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस सरकारमध्ये हे करावे लागले नाही.. 2014 च्या ‘खऱ्या स्वातंत्र्या’नंतर काय अवस्था झाली आहे..” या आशयाची पोस्ट स्वराने केली आहे.

स्वराच्या पोस्टनंतर भाजप नेते दुबे यांनीही केला पलटवार

स्वराने निशाणा साधल्यानंतर भाजप नेते निशिकांत दुबेही गप्प बसले नाहीत. त्यांनीही पलटवार करत एक्सवर एक पोस्ट केली. त्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टला टॅग करत लिहिले, “धर्म परिवर्तन करणारे मुल्लेही ज्ञान वाटत आहेत.”

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतला मोठा निर्णय

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देणे आणि दिल्लीतील पाक उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यासारख्या पावलांमुळे पाकिस्तानच्या शहबाज सरकारवर दबाव वाढला आहे. भारताच्या या कारवायांना उत्तर म्हणून पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली, ज्यात भारतासारखीच प्रत्युत्तराची पावले उचलण्याची चर्चा झाली. सर्वात धक्कादायक विधान हे होते की पाकिस्तान आता शिमला करार रद्द करण्याची धमकी देत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;