Pahalgam Attack – पहलगाममध्ये सुरक्षा का नव्हती? सरकारने दिले स्पष्टीकरण

Pahalgam Attack – पहलगाममध्ये सुरक्षा का नव्हती? सरकारने दिले स्पष्टीकरण

जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हते असा सवाल उपस्थित केला जात होता. पण सरकारने यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. या भागातील स्थानिक टूर ऑपरेटर्संनी सरकारच्या परवानगीशिवाय पर्यटकांना आणले त्यामुळे इथे कुठलीच सुरक्षा नव्हती असे सरकारने म्हटले आहे.

NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार जिथे दहशतवादी हल्ला झाला आहे तो भाग अमरनाथ यात्रेच्या वेळी उघडला जातो. अमरनाथ यात्रेला आलेले भाविक इथे आराम करतात. या वेळी स्थानिक टूर कंपन्यांनी सरकारा कुठलीच माहिती न देता पर्यटकांची बुकिंग घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आले. ही बाब सरकारला माहित नव्हती त्यामुळेच इछे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नव्हती असे सरकारने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;