दिल्ली श्रीनगर कटरा वंदे भारत ट्रेन त्वरित सुरू करा, संजय राऊत यांची मागणी

दिल्ली श्रीनगर कटरा वंदे भारत ट्रेन त्वरित सुरू करा, संजय राऊत यांची मागणी

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटन थांबवण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील लाखो पर्यटक जम्मू कश्मीरमध्ये अडकले आहेत. दरम्यान दिल्ली श्रीनगर कटरा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 एप्रिलला होणार होते. मात्र ते झाले नाही. आता अडकलेल्या पर्यटकांना जम्मू कश्मीरमधून बाहेर काढण्यासाठी तत्काळ ही ट्रेन सुरू करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

”दिल्ली श्रीनगर कटरा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 19 एप्रिल रोजी होणार होते, आज हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत, विमान कंपन्या लुटमार करत आहेत, ही ट्रेन सेवा त्वरित सुरू करावी, जेणेकरून हजारो पर्यटक त्यांच्या राज्यात परतू शकतील, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;