हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची

हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची

महायुती सरकारने राज्यात पहिलीपासून मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीबरोबर हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. यातच महायुतीतील मंत्रींची मात्र हिंदी बोलताना चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज महायुतीतील मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला जाणार असल्याच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. याच मुद्द्यावर पत्रकारांनी त्यांना हिंदीत एक प्रश्न विचारला असता हिंदीतून उत्तर देताना नितेश राणे याची बोबडी वळल्याच पाहायला मिळालं. पत्रकारांना हिंदीतून उत्तर देताना अक्षरश: त्यांच्या नाकी नऊ आले. शेवटी ते मराठीतच म्हणाले की, “हिंदीची सक्ती केली तर मी मरेन”.

दरम्यान, इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असतानाच महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. हिंदी भाषा ‘अनिवार्य’ या शब्दाला आम्ही स्थगिती देतोय, असं भुसे म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चांदीच्या प्लेटस्, कांस्याच्या थाळीतून पुरणपोळी, आमरसाची मेजवानी; मंत्री परिषदेच्या बैठकीचा असा हा थाटमाट चांदीच्या प्लेटस्, कांस्याच्या थाळीतून पुरणपोळी, आमरसाची मेजवानी; मंत्री परिषदेच्या बैठकीचा असा हा थाटमाट
मंत्री परिषदेच्या विशेष बैठकीसाठी श्रीक्षेत्र चौंडीमध्ये आलेल्या मंत्र्यांचा थाट हा चर्चेचा विषय ठरला आहे. मंत्री परिषद बैठकीसाठी ‘जर्मन हँगर’ प्रकारचा...
22 कोटींच्या हिऱ्यांचा अपहार; तिघांना अटक
मधमाश्यांच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू
माऊंट अबूच्या नामांतराला विरोध
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकराज संपणार; मुंबई, ठाण्यासह 29 महापालिकांच्या चार महिन्यांत निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाचे आयोगाला आदेश…
आज युद्धाचे मॉकड्रिल! मुंबईसह राज्यातील 16 शहरांमध्ये सायरन वाजणार… ब्लॅक आऊट होणार
हल्ल्याच्या तीन दिवस आधी मोदींकडे होते इनपुट्स! पहलगामबाबत खरगे यांचा खळबळजनक दावा