जंगलाच्या विनाशासाठी आणि मित्रांच्या विकासासाठी भाजपला महाराष्ट्रातली सत्ता हवी होती – जवाहर सरकार

जंगलाच्या विनाशासाठी आणि मित्रांच्या विकासासाठी भाजपला महाराष्ट्रातली सत्ता हवी होती – जवाहर सरकार

राज्य वन्यजीव मंडळाने 1800 हेक्टर वनजमिनीवरील 4 मेगा-प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी 4 लाख झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. यामुळे होणारा जैवविविधतेवरील परिणाम आणि पर्यावरणाच्या गंभीर संकटांचा इशारा दिला आहे. याबाबत माजी खासदार जवाहर सरकार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला महाराष्ट्रातील सत्ता का हवी होती, सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा आटापीटा का सुरू होता, ते आता स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात झांडांच्या कत्तलीमुळे जंगलांचा विनाश होणार आहे. यातून भाजपच्या मित्रांचा विकास होणार आहे, असा हल्लाबोल सरकार यांनी केला आहे.

याबाबत सरकार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, याचसाठी भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता हवी होती. सत्तेसाठी त्यांनी आमदार विकत घेतले, आमदार फोडले आणि निवडणुकीत गडबड घोटाळे करत सत्ता बळकावली आहे. आता भाजपचे मित्र चार लाख झाडे नष्ट करतील. त्यामुळे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. तसेच सुमारे 2000 हेक्टर वनजमीन उद्ध्वस्त होणार आहेत, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य वन्यजीव मंडळाने चारही मेगा-प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. 4 लाखांहू अधिक झाडांची कत्तल होणार असून 2000 वनजमीन उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे यावर टीका होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;