Raigad News – श्रीवर्धनच्या समुद्रात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने सख्ख्या भावांसह तिघे बुडाले

Raigad News – श्रीवर्धनच्या समुद्रात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने सख्ख्या भावांसह तिघे बुडाले

पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा श्रीवर्धनमध्ये बुडून मृत्यू झाला. वेळास समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि लाटांसोबत समुद्रात खेचले गेल्याने तिघेही बुडाले. मयतांपैकी दोघे सख्खे भाऊ होते. मयुरेश संतोष पाटील, अवधूत संतोष पाटील आणि हिमांशु पाटील अशी मयत तरुणांची नावे आहेत. हिमांशु हा नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहत होता.

तिघे तरुण श्रीवर्धनजवळील गोंडघर गावातील रहिवासी होते. तिघेही शनिवारी सकाळी वेळास समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. तिघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले. यावेळी तिघेही लाटांसोबत समुद्रात खेचले गेले. स्थानिक नागरिकांनी तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

नाका-तोंडात पाणी जाऊन तिघांचाही मृत्यू झाला. स्थानिक तरुण आणि वॉटर स्पोर्ट्स चालकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तरुणांच्या मृत्यूमुळे गोंडघर गावात शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हावर दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हावर दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी...
अशोक सराफ यांना बँकेत नोकरी करताना किती पगार मिळायचा माहितीये का?
पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना साऊथ सुपरस्टारकडून आदिवासींचा अपमान; गुन्हा दाखल होताच मागितली माफी
‘चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं…’, आगरी भाषेत निक्की तांबोळीने विनायक माळीसाठी घेतला खास उखाणा
पहलगाममध्ये जेव्हा पँट उतरवण्यात आली तेव्हा…, FIR दाखल होताच सोन निगमचं स्पष्टीकरण
मंत्रिमंडळ बैठकीसाठी दोन कोटींची होणार उधळपट्टी, चौंडीत जय्यत तयारी सुरू; प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आनंदच! जयंत पाटलांची गुगली