आपण रोज वापरत असलेला टूथब्रश किती दिवसांनी बदलायला हवा! वाचा सविस्तर

आपण रोज वापरत असलेला टूथब्रश किती दिवसांनी बदलायला हवा! वाचा सविस्तर

 

दात घासणे हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सकाळी उठल्यानंतरचा महत्त्वाचा कार्यभाग. पूर्वीच्या काळात लोक दातुनने दात स्वच्छ करायचे पण आज दातुनने दात स्वच्छ करणारा क्वचितच कोणी असेल. आता जवळजवळ प्रत्येकजण टूथब्रशने दात स्वच्छ करतो. टूथब्रशचे दात हे प्लास्टिक किंवा रबरपासून बनवलेले असतात. प्लास्टिक तरीही खराब होते. अशा परिस्थितीत, टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? हे महत्वाचे आहे. टुथब्रश न बदलल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो.

 

toothbrush

 

टूथब्रश किमान दोन महिन्यांनी बदलणे हे खूप गरजेचं आहे. ब्रश कितीही चांगला असला तरी तो बदलायला हवाच. इतक्या दिवसांत ब्रश बदलला नाही तर त्याचे अनेक घातक परिणाम होऊ शकतात. आपण सकाळी ब्रश करतो तेव्हा आपले तोंड स्वच्छ होते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे तुमचा ब्रश चांगला असावा. ब्रश खूप कठीण किंवा खूप मऊ नसावा. कडक ब्रशपेक्षा मऊ ब्रश जास्त फायदेशीर आहे. ब्रशचे दात तुटले असतील, तर तो ब्रश ताबडतोब बदला. टूथब्रश खूप कठीण झाला असेल आणि हिरड्यांना टोचत असेल तर तो ताबडतोब बदला.

 

आठवड्यातून एकदा टूथब्रश सॅनिटाइज करणे महत्वाचे आहे. ज्या स्टँडमध्ये ते ठेवले आहे ते देखील स्वच्छ करणे आवश्यक आहे. टूथब्रश आठवड्यातून एकदा गरम पाण्याने स्वच्छ करा. असे केल्याने बॅक्टेरिया टूथब्रशमध्ये प्रवेश करणार नाहीत.

 

डॉक्टर म्हणतात की, जास्तीत जास्त तीन ते चार महिन्यांत तुमचा टूथब्रश बदलला नाही तर सर्वप्रथम तुमच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होईल. टूथब्रशचे दात कमकुवत झाल्याने, तुमच्या दातांमधील घाण काढू शकणार नाही. यामुळे तुमच्या हिरड्यांमध्ये असंख्य बॅक्टेरिया आणि विषाणू राहतील. या सर्वांमुळे अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार होतील. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, तोंडाचे आरोग्य चांगले नसेल तर त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर मला त्यांचा अभिमान, अमृता फडणवीस यांनी पीएम मोदी यांचे केले कौतूक …तर मला त्यांचा अभिमान, अमृता फडणवीस यांनी पीएम मोदी यांचे केले कौतूक
मला खूप आनंद आहे की आपण WAVES 2025 परिषदे सारखा उपक्रम राबवला आहे, आज त्याचा तिसरा दिवस आहे मला वाटते...
‘…म्हणजे विषयच संपला’, पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंचा संताप, केली मोठी मागणी
WAVES 2025ला सैफ अली खानची हजेरी, म्हणाला ‘रामायण महाभारत…’
आमची मैत्री जुनी आहे, पण मी त्याच्याकडे काही मागत नाही, शिंदे यांच्याकडे पाहात नानांचा डायलॉग
फुलेरामध्ये निवडणूक, ‘पंचायत’च्या चौथ्या सीजनचा Teaser प्रदर्शित
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला जागा देण्यास 7 गावांचा विरोध, पोलिसांच्या लाठीमारामुळे महिलेचा हार्टॲटॅकने मृत्यू
पंतप्रधानांचे 44 परदेश दौरे, पण मणिपूरमध्ये एक सेकंदही घालवला नाही; मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींवर निशाणा