‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?

‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?

कोकणातील एकनाथ शिंदे गटाचे मातब्बर नेते भरतशेठ गोगावले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ओळखल्या जातात. कोकणी माणसासारखे ते वरवर कडक वाटत असले तरी आतून फणसासारखे गोड आहेत. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून अनेकांना हादरा दिला. त्यांच्या वक्तव्याने महायुतीमधील बड्या नेत्यांना घाम फोडला. त्यांच्या राजकीय फटकेबाजीचे त्यांचे विरोधक सुद्धा स्तुती करतात. भरतशेठ यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला.

आधी पटवलं अन् मग लग्न केलं

रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी गोरेगाव शहरांमध्ये भरत गोगावले यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. त्यांनी आपल्या खास अंदाजात त्याचे प्रेम आणि नंतर लग्नाचा किस्सा सांगितला. आधी पटवलं अन् मग लग्न केलं असे ते म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या विधानाची एकच चर्चा आता रंगली आहे.

ते म्हणाले की, मुंबईत जाऊन केले. पण वडील गावी आहेत. घरची जबाबदारी आहे. मी पत्नीला सांगितलं की आपल्याला गावाला जावं लागेल. मुंबईहून शेती करायला गावी आलो. मात्र गावी जाऊन तिने तेवढीच साथ दिली. भात लावण्यापासून ते काढण्यापर्य़ंत मळणी करण्यापासून सगळं केलं म्हणून आज सुखाचे दिवस बघतोय. पत्नीने पण मला तेवढी साथ दिली, असे कौतुक भरत गोगावले यांनी केले. तिच्या खंबीर साथीमुळे आपला संसाराचा प्रवास सुखाचा झाला असे ते म्हणाले. त्यांच्या या किस्साची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

भरतशेठ गोगावले यांच्या या अनोख्या प्रेमकथेमुळे राजकारणातील एक हळवा कोपरा सुद्धा समोर आला. त्यांनी यावेळी पत्नीने दिलेल्या खंबीर साथीचा आवर्जून उल्लेख केला. तिच्या मदतीमुळे आपल्याला सुखाचे दिवस आल्याचे ते म्हणाले. त्यांनी प्रेमाचा आणि लग्नाचा किस्सा सांगितला. ते कुणबी समाज सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नी सुषमाताई गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी...
“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…
साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू
पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले
भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर