मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता, टँकर संपावरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता, टँकर संपावरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका

टँकर चालकांवर कुठलाही दंड आकारला जाणार नाही असे पालिकेने जाहीर करावे असा मार्ग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी टँकर संपावर सुचवला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, टँकर संपात सहभागी झालेल्या लोकांशी आम्ही चर्चा केली. त्यातून एकच मार्ग निघतो तो म्हणजे पालिकेने टँकर चालकांना आश्वासन द्यावे की 15 जून नव्हे तर अनिश्चित काळासाठी त्यांच्यावर दंड आकारला जाणार नाही.

मुंबई महानगरपालिका यावर तोडगा काढेल अशी मला आशा आहे. मुंबईकर पाण्यावाचून तडफडत आहेत याची भाजप सरकारला बिलकूल चिंता नाही. केंद्र सरकारने भूजलबाबत काही नियम तयार केले आहेत. हे नियम इतर शहरांना लागू होऊ शकतात पण मुंबईची गोष्ट वेगळी आहे.

गेल्या चार वर्षांपासून हा मुद्दा धूळखात पडला आहे. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी अचानक टँकर मालकांवर दंड आकारायला सुरुवात केली आहे. मुंबईत महावीर जयंती, हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सुरू असताना टँकर चालकांना संप करावा लागला.

भाजप नेता, मुंबई द्रोही व्यक्तीने हे जाणून बुजून केले नसेल ना? सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे, त्यांना फटका बसावा म्हणून हे षडयंत्र कुणी रचलं नसेल ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

केंद्र सरकार यावर दखल घेऊन मुंबईसाठी काही नियमांत बदल करतील. अशा वेळी मुंबईला काय हवंय हे सरकारला माहितच नाही. तसेच मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता, यासाठी आम्हाला आंदोलन, मोर्चा काढावा लागला नसता हे दुर्दैवं आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;