महायुतीने समृद्ध महाराष्ट्राला दिवाळखोर केलं, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

महायुतीने समृद्ध महाराष्ट्राला दिवाळखोर केलं, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

परिवहन महामंडळाकडे निधी नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56 टक्केच पगार देण्यात आला आहे. यावरून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली आहे. महायुतीने दिवाळखोर केला समृद्ध महाराष्ट्र माझा, अशी टीका त्यांनी X वर एक पोस्ट करत केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “महायुतीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आणली आहे. साठ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पूर्ण पगारही देऊ शकत नाही, एवढी वाईट अवस्था आहे. मंत्रिमंडळात पालकमंत्रीपद आणि आमदारांना निधी देण्यावरून गँगवार सुरु आहे. जनतेचा पैसा कमिशन खाऊन आणि भ्रष्टाचार करून लुटला जात आहे. राजकीय स्वार्थापायी महाराष्ट्राला कंगाल केले जात आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;