Waqf Board Amendment Bill – वक्फच्या जमिनीपेक्षाही मोठा मुद्दा त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने आपली गावं वसवली आहेत, अखिलेश यादव यांनी लोकसभेत सरकारला घेरलं

Waqf Board Amendment Bill – वक्फच्या जमिनीपेक्षाही मोठा मुद्दा त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने आपली गावं वसवली आहेत, अखिलेश यादव यांनी लोकसभेत सरकारला घेरलं

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आज मांडण्यात आले. त्यावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. या चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या मुद्द्यावरून केंद्रातील एनडीए सरकारला घेरलं. अखिलेश यादव यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला.

आपलं अपयश झाकण्यासाठी सरकारने हे विधेयक आणल्याचा हल्लाबोल अखिलेश यादव यांनी केला. सरकारचा डोळा वक्फच्या जमिनींवर आहे. पण वक्फच्या जमीनपेक्षाही मोठा मुद्दा हा देशाच्या त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने कब्जा करून गावं वसवलं आहे, असा घणाघात अखिलेश यादव यांनी केला.

भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतेय! संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा

हे अपयशांचं विधेयक आहे. या सरकारने नोटबंदीचाही निर्णय घेतला होता. पण अजूनही जुन्या नोटा बाहेर येत आहेत. हे अपयश शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरचंही आहे. महागाईच्या मुद्द्यावरही सरकार अपयशी आहे. गंगा स्वच्छ झाली का? स्मार्ट सिटी झाली का? यावेळी अपयशाचा पडदा हा वक्फ विधेयकाला बनवलं आहे. ज्यांच्यासाठी हा निर्णय होणार आहे त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केलं जातंय. भाजप जेव्हा कधी विधेयक आणतं ते आपलं अपयश झाकण्यासाठीच, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

महाकुंभमध्ये अनेकांचा जीव गेला. इथेही सरकार आपलं अपयश झाकत आहे. कुंभमध्ये ज्यांच्या मृत्यू झाला त्यांची माहिती सरकारने द्यावी. जे 1 हजार हिंदू गायब झाले त्यांच्याबद्दल सरकारने बोलावं. धर्माच्या मुद्द्यावर व्यवहार होऊ शकत नाही. कुंभ ही काही व्यवहार करण्याची जागा आहे का? असा सवाल उपस्थित करत अखिलेश यादव यांनी निशाणा साधला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;