फडणवीस आणि कंपनीकडून गंडवागंडवी सुरूच, सध्या पैसेच नाहीत, त्यामुळे तूर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नाही!

फडणवीस आणि कंपनीकडून गंडवागंडवी सुरूच, सध्या पैसेच नाहीत, त्यामुळे तूर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नाही!

फडणवीस आणि कंपनीकडून गंडवागंडवी सुरूच आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान’ योजनेचा आर्थिक बोजा सरकारवर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱयांना आज तरी कर्जमाफी देणे शक्य नाही. उद्या काय होईल, हे सांगता येणार नाही,’ असे आज फडणवीस सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. भरणे यांच्या या विधानानंतर शेतकऱयांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अजितदादांना दोष देऊ नका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच महायुतीच्या इतर प्रमुख नेत्यांनीही शेतकऱयांना तूर्त कर्जमाफी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकटय़ा अजित पवारांना दोष देणे योग्य होणार नाही, असेही भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरकारविरोधात संताप

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कर्जमाफी मिळाली नाही. आता सगळेच मंत्री हात वर करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;