औरंगजेबाचा विषय अनावश्यक, संघाने पुन्हा टोचले भाजपचे कान

औरंगजेबाचा विषय अनावश्यक, संघाने पुन्हा टोचले भाजपचे कान

गेल्या महिन्याभरापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असून यावरून नागपूर दंगली ही घडली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भाजपचे कान टोचत म्हटलं होतं की,” औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही.” याच मुद्यावरून आता पुन्हा एकदा संघाने भाजपचे कान टोचले आहेत. या मुद्यावर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले आहेत की, औरंगजेबाचा विषय अनावश्यक आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भैय्याजी जोशी म्हणाले की, “औरंगजेबाचा विषय अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी तर अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे हिंदुस्थानच्या उदारतेचं, सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे.”

संघाने भाजपचे कान टोचले… औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;