मोदी सरकारने बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवलंय, मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

मोदी सरकारने बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवलंय, मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या निर्णयाला त्यांनी जनविरोधी असल्याचं म्हणत सरकार बँकांना ‘कलेक्शन एजंट’ बनवत असल्याचा आरोप केला आहे. खर्गे म्हणाले की, या शुल्कवाढीमुळे सामान्य जनतेची लूट होत असून, सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारत आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना म्हटले की, “मोदी सरकारने बँकांना कलेक्शन एजंट बनवले आहे. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंडाच्या नावाखाली बँकांनी जनतेकडून तब्बल 43,500 कोटी रुपये वसूल केले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 28 मे रोजी एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवण्यासाठी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, 1 मे पासून जर ग्राहकांनी एटीएममधून मासिक मोफत व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना पुढील व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागतील. यावरूनच त्यांनी ही टीका केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;