‘हे’ अत्यंत चिल्लर लोकं, संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात

‘हे’ अत्यंत चिल्लर लोकं, संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात

ए खून के प्यासे बात सुनो’ ही कविता बॅकग्राऊंडला असलेली व्हिडीओ क्लिप पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्तवपूर्ण मत व्यक्त करत त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला. ‘विरोधी मत, व्यंग हा गुन्हा नाही! अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण झालेच पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायलयाने व्यक्त केले. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे व भाजपला फटकारले आहे.

”इम्रान प्रतापगढी यांनी जे गाणं केलं होतं ते गुजरातच्या स्थितीवर होतं, त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. कुणाल कामराच्या प्रकरणाबाबतही हेच घडलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की एका कवितेमुळे, परखड भाष्यामुळे, रंगामुळे सरकार, राजकारण्यांना अस्वस्थ व्हायचं कारण नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. अशाप्रकारे गुन्हे दाखल करणं, दहशत निर्माण करणं आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. ते मत ज्यांनी कुणाल कामाराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा कायद्याच्या पलिकडे जाऊन सल्ला त्या मुख्यमंत्र्यांनी व ज्यांनी स्टुडिओ फोडला त्यांनी ऐकायला हवं. ज्यांना न्यायाची बूज असेल तर हा निकाल ऐकावा. कारण या महाराष्ट्रात व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुडदा पडलाय. एकप्रकारे गुजरात, उत्तर प्रदेश पॅटर्न इथे राबवला जात आहे. महाराष्ट्र थोडा वेगळा असं वाटलं होतं पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी तोच मार्ग निवडला आहे. अजित पवार यांना ते मान्य नाही. त्यांचा मार्ग वेगळा आहे. मात्र अजित पवार त्यांच्या कैदेत अडकले आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केला.

”कुणाल कामराशी मी बोललो. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरे जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो. अभिव्यक्तीस्वातंत्र्यात असे हल्ले आपल्याला सहन करावे लागतात. कुणालला जर तुम्ही तुमचे शत्रू मानत असाल तर या महाराष्ट्राला वाटतंय की अमित शहा आणि नरेंद्र मोदी देशाचे शत्रू आहेत, त्यांच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे बसले आहेत. तुमच्यावर टीका केली म्हणून कुणाल कामरा देशाचे शत्रू ठरू शकत नाही. तुम्ही म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाही; तुम्ही अत्यंत चिल्लर लोकं आहात”, असी टीका संजय राऊत यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;