शेतकऱ्यांवर बळजबरी करू नका, शिवसेनेने उचलला शक्तीपीठचा मुद्दा

शेतकऱ्यांवर बळजबरी करू नका, शिवसेनेने उचलला शक्तीपीठचा मुद्दा

शक्तिपीठाच्या नावाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पाणभरती शेतजमिनी अधिगृहित केल्या जात आहेत. एकीकडे महाराष्ट्रात कृषीक्षेत्र मोठय़ा प्रमाणावर घटते आहे, तर दुसरीकडे शेतजमिनी मोठय़ा प्रमाणावर ताब्यात घेतल्या जात आहेत. सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये, अशी मागणी शिवसेनेने  आज लोकसभेत केली. शिवसेना खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात शक्तिपीठाचा मुद्दा उपस्थित केला. तिरूपती बालाजी, हैदराबादला जाण्यासाठी रस्ता जोडला जावा. त्यामुळे तिरूपतीला जाण्यासाठी मराठवाडय़ासह विदर्भातील लोकांची सोय होईल. परभणी ते पुणे, परभणी ते संभाजीनगर रस्ता सहापदरी करावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी या वेळी केली. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी करत असलेल्या कामाची प्रशंसा करताना जाधव यांनी संत तुकारामांचा ‘शुद्ध बीजापोटी’ हा अभंग सभागृहात म्हणून दाखविला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;