मला सभागृहात बोलू दिले जात नाहीय, ही सरकारची नवी शक्कल; राहुल गांधी यांची टीका

मला सभागृहात बोलू दिले जात नाहीय, ही सरकारची नवी शक्कल; राहुल गांधी यांची टीका

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभवर लोकसभेत भाषण केलं तेव्हापासून आजपर्यंत मला सभागृहात बोलू दिले जात नाहीय. आज काहीही झालेले नसताना अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलं. ही या सरकारची नवीन शक्कल आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.

”जेव्हाही मी बोलण्यासाठी उभा राहतो मला बोलू दिले जात नाही. आज मी सभागृहात शांत बसून होतो एक शब्दही बोललो नाही. गेल्या सात आठ दिवसात मला एकदाही बोलू दिले नाही. आज मी बोलू द्यावे यासाठी विनंती केली पण ते सभागृहातून पळून गेले. हे सभागृह चालवण्याची ही पद्धत नाही. ते माझ्याबद्दल काहीतरी बोलले आणि निघून गेले”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;