तापमानवाढीचे अवघ्या जगासमोर आव्हान

तापमानवाढीचे अवघ्या जगासमोर आव्हान

अवघे जग हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात आहे. राज्यात फेब्रुवारीतच कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. जागतिक स्तरावर तापमानात सरासरी 1.65 सेल्सियस वाढ झाली आहे. आतापासून योग्य पावले न उचलल्यास दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ आणि प्राणी-पक्ष्यांना धोका निर्माण होईल, अशी चिंता तज्ञांनी व्यक्त केली.

 23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा झाला. या पार्श्वभूमीवर जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यावर जगात मोठय़ा प्रमाणात विचारमंथन होताना दिसतेय. विविध मानवी उलाढालींमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. वीज प्रकल्प, वाहतूक, इंधन यामुळे जगात 1.2 अंश सेल्सियस तापमान वाढले आहे. हरितगृह वायूचे प्रमाण वाढले आहे. 19 व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड या एकटय़ा हरितगृह वायूचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या 20 वर्षांत त्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जंगलतोड होतेय.

हिंदुस्थानात 125 वर्षांत फेब्रुवारी सर्वात उष्ण ठरला. हवामान बदलाचे अनपेक्षित परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे असे हवामान खाते, पुणे येथील माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.  हवामान बदलाचे अनेक परिणाम दिसून येतात. मुसळधार पाऊस, वादळ, सुपीक जमीन ओसाड होणे, उष्णतेची लाट असे बदल होऊ शकतात.

परिणाम काय

19 व्या शतकापासून जगभरातील तापमानात 1.2 अंश सेल्सियसची वाढ. u वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले. u  या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढण्याची भीती. u शास्त्रज्ञांनी हवामान बदलासाठी 1.5 अंश सेल्सियसपर्यंत तापमानवाढीची मर्यादा ठरवली होती. 2024 मध्येच जगाचे सर्वसाधारण तापमान 1.65 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवण्यात आले. ते आता 1.5 अंश सेल्सियसपर्यंत रोखणे गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;