Ratnagiri News – खोपी येथील वणव्यात चार घरे बेचिराख; सुदैवाने जिवीतहानी टळली

Ratnagiri News – खोपी येथील वणव्यात चार घरे बेचिराख; सुदैवाने जिवीतहानी टळली

रत्नागिरीतील खोपी येथे लागल्यात वणव्यात चार घरे जळून बेचिराख झाली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही. या वणवा वाढत गेला आणि घरे बेचिराख झाली. मात्र, तो वणवा विझवायला तिथं पाणीच नव्हतं. त्यामुळे माणसांचे आणि गुराढोरांचे जीव वाचले. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खोपी गावात घडली. गोरगरीबांचे अख्खं घर जळून खाक झाले आहे.

खोपी गावात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाभलेवाडीत वणवा लागला. हा वणवा भडकत गेला. या वणव्यात जाभलेवाडीतील चार घरे जळून बेचिराख झाली. सुदैवाने तिथे जीवितहानी झाली नाही कारण उन्हाळा सुरू झाला की जाभलेवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष होते. गावात पाणी नसल्याने जवळच्या पाणवठ्याजवळ ही कुटुंब स्थलांतरित होतात. अशीच ही चार कुटुंब पाण्यासाठी स्थलांतरित झाली होती. जाभलेवाडीतील घरात त्यांच्या वस्तू तशाच होता. वणवा लागल्यानंतर विझवायला गावात पाणी नव्हतं. त्यामुळे तो वणवा भडकत गेला. त्या आगीत चार घरे जळून खाक झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;