झारखंड हादरले! पेंढ्याला आग लागली, चार मुलं होरपळली

झारखंड हादरले! पेंढ्याला आग लागली, चार मुलं होरपळली

झारखंडच्या चाईबासा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली. गीतिलीपी गावात एका घराबाहेर असलेल्या पेंढ्याला आग लागली. यावेळी त्या पेंढ्यात खेळत असलेल्या चार मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चाईबासा जिल्ह्यातील जगन्नाथपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गीतिलीपी गावात घडली. सोमवारी (17 मार्च) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर असलेल्या पेंढ्याच्या ढिगाऱ्याजवळ चार मुलं खेळत होती. यावेळी अचानक त्या पेंढ्यांच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. त्यामुळे चारही मुलांचा या आगीत होरळपून मृत्यू झाला.

दरम्यान आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ तेथील आग आटोक्यात आणली. यानंतर पोलिसांनी चारही मुलांचे जळालेले मृतदेह काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;