जलपर्णीने उल्हास नदीचा श्वास कोंडला

जलपर्णीने उल्हास नदीचा श्वास कोंडला

कचरा, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य, गटाराचे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे रायते पुलाजवळील उल्हास नदीत जलपर्णीने हातपाय पसरल्याने नदीपात्राचा श्वास कोंडला आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून उल्हास नदीवर जलपर्णीचा गालिचा पसरला आहे. जलपर्णी काढण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असून प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. जलशुद्धीकरण केंद्रच नाही उन्हाळा सुरू झाला की उल्हास नदी पात्राला जलपर्णी घट्ट विळखा घालते. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. उल्हास नदीच्या काठी आपटी, मांजर्ली, भिसोळ, आणे, कांबा, वरप, म्हारळ आदी गावे आहेत. या गावांना रायते पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र २००५ पासून या योजनेला जलशुद्धीकरण केंद्रच नाही. त्यामुळे उल्हास नदीचे पाणी टाकीत सोडण्यात येते. प्रक्रिया न करता पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;