फडणवीस-अदानींची मध्यरात्री बंद दाराआड दीड तास चर्चा

फडणवीस-अदानींची मध्यरात्री बंद दाराआड दीड तास चर्चा

मुंबईत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हालचाली वाढल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील बाहेर आला नसला तरी मुंबईतील धारावी, गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पांबरोबरच कुर्ला, वरळी डेअरी व अन्य भूखंडांबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारने टीडीआरचे दर मर्यादित ठेवले असले तरी इतर बिल्डर्सना त्यांच्या प्रकल्पांसाठी टीडीआर वापरायचा असेल तर किमान 40 टक्के टीडीआर धारावी प्रकल्पातून म्हणजेच अदानींकडून खरेदी करावा लागणार आहे. त्यावरही चर्चा झाल्याचे कळते. फडणवीस-अदानी यांच्यात दोन तास चर्चा झाली. रात्री दहाच्या सुमारास सागरवर गेलेले अदानी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सागर बंगल्यातून बाहेर पडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;