‘आरएसएस’ हे विष! तुषार गांधींचे वक्तव्य

‘आरएसएस’ हे विष! तुषार गांधींचे वक्तव्य

‘आपण भाजपचा पराभव करू शकतो. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हे विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे परखड मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले. यावर भाजप आणि संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, तुषार गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, मी माफी मागणार नाही, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधीजी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते केरळमधील तिरुअनंतपुरम येथे दिवंगत गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी तुषार गांधी यांनी भाजप आणि संघावर परखड शब्दांत टीका केली. ‘भाजपचा पराभव करू शकतो, पण आरएसएस हे विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला या घडामोडींची भीती वाटायला हवी. कारण जर आत्माच नष्ट झाला तर सारं काही नष्ट होईल,’ असे तुषार गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;