शिक्षिकेने तपासण्यासाठी आणलेले बारावीचे पेपर घरात जळून खाक, निकालावर परिणाम होण्याची शक्यता

शिक्षिकेने तपासण्यासाठी आणलेले बारावीचे पेपर घरात जळून खाक, निकालावर परिणाम होण्याची शक्यता

एका शिक्षिकेने बारावीचे पेपर घरी तपासण्यासाठी आणले होते. घरात आग लागल्यावर हे पेपरही जळू खाक झाले आहेत. यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

विरारमध्ये एका शिक्षिकेने बारावीचे ओसी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आणल्या होत्या. पण घरात आग लागली आणि या आगीत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. विरारमधील बोळींज नानभाट येथील गंगूबाई अपार्टमेंट ही धक्कादायक घटना घडली. उत्तरपत्रिका या शाळा आणि कॉलेजमध्येच तपासणे बंधनकारक असतात, असे असताना या शिक्षिकेने या उत्तरपत्रिका घरी आणल्याच कशा हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या मुळे ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत त्यांच्या निकालावर परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;